loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ)राज्यपाल कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान : विरोधकांची कारवाईची मागणी

Jul 30, 2022


महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेआहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.  “गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही..!!” असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. दरम्यान राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून काय मागणी करतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.