loader image
[ays_poll id=7]

६०८ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

Aug 12, 2022


राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली असून १८ सप्टेंबर २०२२ रोजी ही निवडणूक होणार असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. थेट जनतेतून यंदा सरपंच निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला.

सुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार होतं कमी पाऊस असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा. कोर्टाच्या या आदेशानुसार, सध्या कमी पाऊस असलेल्या राज्यातील ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असा असेल

१८ ऑगस्ट २०२२ – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल

२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ – नामनिर्देशपत्रे दाखल करता येतील

२७, २८, ३१ ऑगस्ट २०२२ – शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत

२ सप्टेंबर २०२२ – अर्जांची छाननी होईल

६ सप्टेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

१८ सप्टेंबर २०२२ – मतदान होईल (स. ७.३० ते सायं. ५.३०)

१९ सप्टेंबर २०२२ – मतमोजणी होईल.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.