loader image
[ays_poll id=7]

नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी खुले करणार

Sep 4, 2022


नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगीगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणावरून भावीक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात सप्तशृंगीगड पवित्र तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी भावीक भक्तांची रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते पण गेल्या 22 जुलैपासून सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे वज्रलेपवर मूर्ती संवर्धनाचे काम चालू असल्याने गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी हे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून खुले करणार असल्याने याबाबतची घोषणा देवी संस्थान हे पत्रकार परिषद घेऊन आज करणार असल्याचे देवी संस्थान कडून सांगण्यात आलेले आहे सप्तशृंगगड हे समुद्र सपाटी पासून 5000 मीटर उंचीवर असल्याने व दहा किलोमीटरचा घाट पार करून सप्तशृंगी गडावर पोहचता येते.

यापूर्वी कोरोना काळामध्ये सप्तशृंगी चे मंदिर हे एक वर्षासाठी बंद करण्यात आलेले होते व आता पुन्हा मंदिराचे काम बंद करण्यासाठी दीड ते दोन महिने मंदिर बंद ठेवल्याने सप्तशृंगी गडावरील व्यापार्यांचे अर्थकारण ठप्प झाले आहे, पुन्हा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवी संस्थाने घेतल्याने पुन्हा दुकान व धंद्यावरती परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मंदिरा संबधी तहसीलदार, देवी संस्थान चे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व व्यापारी सह ग्रामस्थ याबरोबर चर्चा करण्यात आली यामध्ये मंदिरातील मुर्ती सह इतर कामे थोड्याफार प्रमाणात बाकी असल्याने व व पुरोहित मार्गदर्शन सदरची विधीवत पुजा करून पितृपक्ष झाल्यावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सदर सप्तशुंगी चे मंदिर खुले करण्याबाबत ग्रामस्थाशी प्राथमिक चर्चा केली या निर्णयाबाबत आज पत्रकारपरिषद घेण्याबाबत देवी संस्थान ने पत्र ही काढले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.