स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन
चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या चांदवडी रुपय्या काव्य स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील कवींनी आपल्या कविता स्पर्धेसाठी पाठवाव्यात. कविता मराठीत टाईप करून गुगलफॉर्मवर पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष रावसाहेब जाधव तसेच सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी केले आहे. यासाठी सोबत असणारी लिंक किंवा QR कोड स्कॅन करून फॉर्म भरावा.

स्पर्धेचे नियम व अटी :
◆ काव्य स्पर्धा फक्त नाशिक जिल्हा पुरती मर्यादित आहे.
◆एका कवीने एकच कविता स्पर्धेसाठी पाठवावी.
◆कविता स्वलिखित असणे अनिवार्य आहे. संकलित केलेली, दुसऱ्याची अथवा दुसऱ्या कवितेच्या ओळींत छेडछाड केलेली रचना स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
◆कविता मराठी असावी.
◆आपली कविता मोबाईल वर मराठी फोन्ट मध्ये टाईप करून ठेवा.
तसेच कोऱ्या कागदावर सुवाच्छ हस्ताक्षरात लिहून त्याचा वाचण्यायोग्य फोटो मोबाईल मध्ये काढून ठेवावा.
◆काव्य स्पर्धेसाठी कोणतेहि शुल्क नाही.
◆काव्य स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची मुदत १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे.
◆निकाल चांदवडी रुपय्याच्या ग्रुपवर जाहीर होतील.
◆नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे












