loader image
[ays_poll id=7]

घाटमाथ्यावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वैद्यकीय अधिकार्यांची बघ्याची भुमिका

Oct 8, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील आठ गावे व तांडे वाड्यावस्त्यांवर ठिकठिकाणी बोगस बंगाली डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता नसतांना आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्याचे दिसून येत असून बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आणि जातेगांव येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविका यांना व पोलीस विभागास सर्व कल्पना असतांना देखील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर प्रशासन का कार्यवाही करत नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
या विषयी आरोग्य विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार नसून त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमलेली असते.
व त्या समितीला आम्ही वेळोवेळी कोणकोणत्या गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे बंगाली व इतर स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाऱ्या बाबत तोंडी व लेखी पत्र पाठविले आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन कारवाई करण्यात येत नाही, व वरिष्ठांना आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही असे सांगितले.
वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असलेल्या संघटनेने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका प्रमुख प्रदीप थोरात यांनी मागील काही महिण्यांपुर्वी अशा बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मे.जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देउन तसेच तहसील कार्यालयाच्या समोर नांदगाव येथे उपोषण देखील केले. मात्र शासनाच्या वतीने बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचे दुरच राहिले व त्या उपोषणाला बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, अशा डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी एखाद्या रुग्णांने त्या डॉक्टर कडे काही उपचार घेतल्याचा पुरावा पाहिजे, तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरु असल्या बाबत त्यांच्या दवाखान्याचे फोटो, व्हिडीओ आणि अर्ज सादर केला पाहिजे. त्यानंतर आमच्याकडून त्यांच्यावर धाड टाकून कार्यवाही कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर देन्यात आले.
शासनाच्या वतीने नगरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून प्रत्येक गावात आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्फत अशा बोगस डॉक्टरां बाबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी माहिती घेऊन कार्यवाही करु शकतात, मात्र आरोग्य विभागच शासनाचे नियम कशासाठी कोणाला खुश करण्यासाठी पायदळी तुडवत आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चर्चेचा विषय झाला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.