loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगरपालिकेच्या भरारी पथकाने शहरात सिंगल युज प्लास्टिक विक्रेत्याकडून ५००० रूपये दंड वसूल

Nov 2, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
याबाबत अधिक वृत असे की देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर एक जुलै पासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्या अनुषंगाने नांदगाव नगरपरिषदेच्या पथकाने बुधवारी ( दि.२) रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टीक विक्री करणा-या विक्रेत्यास ५०००/- (पाच हजार रुपये दंड केला आहे व अंदाजे ३ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.

सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो जर कोणी एकेरी प्लास्टिकचा वापर करताना आढळलं तर, त्यांना शिक्षा केली जाईल, असं पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल, असंही या कायद्यात म्हटले आहे.
सदरील कारवाई मुख्याधिकारी विवेक धांडे यांचे मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राहुल कुटे, विजय कायस्थ, रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, सुनिल पवार, अंबादास सानप, विजया धनवट यांचे पथकाने केली आहे. यापुढे देखील नांदगाव शहरात प्लास्टीक बंदीची कारवाई मोठया प्रमाणात सुरू राहणार असुन नागरीकानी प्लास्टिकची विक्री व वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.