loader image

बळीराजाला कोणीही पाठीराखा उरलेला नाही – शेतकरी नेते राजू शेट्टी यांची खंत

Nov 7, 2022


मनमाड – सर्वच सरकारे ही एकाच माळेचे मणी असून मागील सत्तेत असलेले आणि विद्यमान सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असलेली अनास्थेमुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने मारायचे असा प्रश्न सध्या पडला आहे, असा हल्लाबोल आज स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी केला.

सातत्याने निसर्गाचा होणारा कोप, पावसाची अनिश्चितता आहे. कमी वेळ त जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते.यामुळे बळीराजा संकटात सापडतो. एनडीआरएफचा निकष देखील बदलावे लागणार आहेत, असंही राजू शेट्टी म्हणाले.

यंदा सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओला दुष्काळ परिस्थिती असताना सध्याचे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे खंत व्यक्त करत विरोधी पक्ष गप्प असून विरोधी पक्षातले नेते नोटिसामुळे भेदरलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाठीराखा नसल्याची टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनमाड येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.