दिल्ली येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे मुंबईतील रहिवासी श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.
आफताब पूनावला या नराधमाने अतिशय क्रूरतेने हि हत्या केली त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे ह्रदय हेलावून गेले अशा ह्या क्रूरकर्मा आफताब पुनावाला या नराधमास भररस्त्यात फाशी द्यावी व श्रद्धा वालकरच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्याकरिता बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शाखेतर्फे २१/११/२०२२ सोमवार रोजी सायं ६:३० वा. गांधी चौक मनमाड येथून कँडल मार्च मोर्चा निघणार आहे.
तरी मनमाड शहरातील सर्व जाती धर्माच्या महिला व पुरुषांना विनंती करण्यात येते की मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रद्धाताईस न्याय मिळवून देण्याकरिता तसेच आफताब पूनावाला या नराधमास कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीता सर्वांनी एकत्र यावे
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











