नांदगाव
लव्ह जिहाद ,धर्मांतर गोहत्या याविरुद्ध कठोर कायदा करावा, श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी जलद न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो युवक, युवती, महिलांंसह नागरिक सहभागी झाले होते.

या मोर्चाचे सकल हिन्दू समाज हिंदूस्थान,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांनी आयोजन केले होते.
शहरातील मालेगाव रोड येथील मविप्र महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेला मोर्चा शनि मंदीर, बालाजी चौक,शिवस्फूर्ती,देवीमंदीर, कालीका चौक,महात्मा फुले चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,रेल्वे गेट मार्गे हुतात्मा चौकात येवून या ठिकाणी मोर्चेकराच्या वतीने घोषणा देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज, भगवा ध्वज युवतींनी, युवकांनी घेतले होते. यावेळी सहभागी झालेल्यांच्या हातात धर्मांतर विरोधी कायदा लागू करा, गोहत्याबंद करा, लव्हजिहादविरोधात कठोर कायदा करा यासह विविध मागण्यांचे फलक होते.युवक, युवती,
महिला व पुरुषांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.
यावेळी डॉ . आनंद पारख, दत्तराज छाजेड, सागर फाटे, योगेश पैठणकर,गणेश शिंदे, महेश गायकवाड, डॉ श्रीकांत देवरे, देवराम फुपाने, संदीप कवड़े, संजय सानप, संगीता सोनवणे, द्वारकानाथ कलंत्री, सूरज परदेशी राहुल पैठणकर, सुमित सोळसे , महेश चौघुले, रवि सोनावणे सिद्धेश भावसार, दर्शन शर्मा, स्वराज शर्मा, विकास शर्मा, मनोज मोकळ,अक्षय पवार,कमलेश काळे, दीपक शिंदे, मयूर शिंदे मयूर खरोटे, शुभम मोकळ, विशाल खेरनार, सौरभ वर्देकर, चेतन जाधव, हर्शल पगार ,शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीसह ग्रामीण भागातील साकोरा,मुळडोंगरी, मनमाड, मालेगांंव, गंगाधरी, जळगांव खुर्द, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.












