सोलापूरच्या अकलूजमधील तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी केलेके लग्न सोशल मीडियावर चर्चेत असून आता हे लग्न कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.
चाकणकरांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे की, “सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत.
“भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्तबाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा.”












