loader image
[ays_poll id=7]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Dec 6, 2022


संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोहीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ साधना संसारे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी व शिक्षक श्री. दीपक काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाज सुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते. त्यांनी जातीभेद व अन्यायाविरुद्ध लढा दिला. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे पंडित राजनीतिज्ञ,लेखक,समाज सुधारक,स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक,दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा,उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा महामानव.आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्यरत्न. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे सांगितले. तर मुख्याध्यापिका सौ. साधना संसारे व शिक्षक श्री सूर्यकांत महाले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत महाले सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रवीण मोरे सर यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.