loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Dec 8, 2022


मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि दिरंगाई तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षा विरोधात मराठा समाजाचे नाना आबाजी शिंदे आणि विष्णू शंकर चव्हान हे सोमवार दिनांक १२ डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनाचा आशय असा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मनमाड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे. जेव्हापासुन महाराजांचा अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे तेंव्हापासुन आजपर्यंत या पुतळयाच्या सुशोभिकरणा विषयी मनमाड नगर परिषदेमार्फत कुठेही लक्ष दिले गेलेले नाही. वा याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासुन अनेक संघटनांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत मागणी करून निवेदने दिली असुन देखील पालिकेकडुन त्यास प्रतिउत्तर म्हणुन फक्त आश्वासणेच मिळाली प्रत्यक्षात कृती झालेली नाही.

मागील शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारी २०२२ ला सांगितले गेले की येत्या चार महीन्यात महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल. यासाठी नाशिकच्या शिवभक्ताला याविषयीचे डिझाईन व आराखडा करून देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु चार महीने होऊन देखील याबाबत पालिकेतर्फे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही वा सुशोभिकरण्याच्या कामास सुरुवात केली असे दिसत नाही.

महाराजांची जयंती जवळ येत आहे तरी याबाबत प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली जात नसेल व आख्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या विषयी असे राजकारण होत असेल तर याच विषयाचा राग, संताप मनमाड मधील सर्व शिवभक्त यांना आहे. सर्व शिवभक्त याविषयी सुशोभिकरणाचे काय झाले असा प्रश्न करीत आहेत. परंतु पालिकेमार्फत वा लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसेल तर मी स्वतः नाना आबाजी शिंदे व श्री विष्णु शंकर चव्हाण सोमवार दिनांक १२ / १२ / २०२२ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे. जर प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही तर त्यावेळी होणाऱ्या परिणामांस मनमाड नगर पालिका जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. ही विनंती कळावे.

आमरण उपोषणकर्ते

नाना आबाजी शिंदे व विष्णु शंकर चव्हाण आमरण उपोषणाचे स्थळ: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक आमरण उपोषण दिनांक १२.१२.२०२२ वार सोमवार वेळ : सकाळी ठिक १०:००


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.