नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज माघारी नंतर शास्त्रीनगर येथील निवडणूक सरपंच व सदस्य बिनविरोध झाले तर कसाबखेड़ा व नवसारी येथील थेट सरपंच हे बिनविरोध झाले. सदस्य पदासाठी ३८ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवार १७५रिंगणात आहेत.
तालुक्यातील.नवसारी,शास्त्रीनगर’ कसाबखेडा या तीन या ग्रामपंचायतील थेट सरपंच बिनविरोध निवड झाली.असून
उर्वरित १२ ग्रामपंचायतीसाठी ३३ उमेदवार रिंगणाआहेत. लक्ष्मीनगर,हिसवळ बुद्रुक याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. इतर ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढत होणार आहे.पंधरा ग्रामपंचायतीसाठी एकूण माघारी अंती १७५ उमेदवार रिंगणात
आहेत. तर १३१ उमेदवारांनी माघार घेतली असून ३८ जागा बिनविरोध निवड झाल्या आहेत.बहुचर्चित अशा मुळडोगरी ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी सर्वाधिक २४ उमेदवार रिंगणात आहे. तर थेट सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली सेटिंग… त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड…. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी… आमिषांचं गाजर… अशा सर्व गोंधळात अखेर आज अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचा तालुकाभर धुरळा उडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार आहे. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी थेट चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे.












