loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांची इजतेमागाहला भेट

Dec 12, 2022


येत्या 15-16 तारखेला नाशिक जिल्ह्याचा तब्लिग जमातचा जिल्हास्तरीय इजतेमा मालेगाव येथील सायना भागातील स्पिनिंग मिल परिसरात होणार आहे, इजतेमाची तयारी अंतिम टप्प्यात असून आपल्या नांदगाव मतदार संघातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहास्तव सुहास आण्णा कांदे साहेबांनी इजतेमागाहला भेट देत इजतेमाच्या जागेची पाहणी केली, आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनाची आणि स्वयंसेवकांनी खासकरून मालेगावच्या मजूर वर्गाने अहोरात्र श्रमदान करून सुंदर भव्य मंडप उभारल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले या शुभ कार्यात माझाही काही खारीचा वाटा असू द्यावा, माझ्यासाठी काही जबाबदारी काही सेवा असेल तर निसंकोच आदेश करा, काही मदत हवी असेल तर सांगा अशी दिलखुलास चर्चा आयोजाकांशी केली, आयोजकांनी आवश्यकता भासल्यास जरुर कळवू असे आश्वासन दिले
नाशिक जिल्हास्तरीय इजतेमा आयोजक समितीचे प्रमुख मालेगावचे हाजी हबीब साहेब यांनी शाल व खजूर भेट देत आमदार सुहास आण्णा कांदे साहेबांचा सत्कार केला, हाजी रफिक मनमाड यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले आमदार साहेबांच्या अचानक दिलेल्या भेटीने नांदगाव,मनमाड, मालेगाव येथील स्वयंसेवकानी एकच गर्दी केली. याप्रसंगी तालुक्यातील सदस्य इम्रान पठाण, अजिज शेख, आयाज शेख, तनवीर सुपर, नगरसेवक अमीन पटेल असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते, नांदगाव मतदार संघातील उपस्थित मुस्लीम बांधवांनी आण्णा साहेबांच्या कामाचे कौतुक केले त्यांच्या दिलदार, आदर्श व्यक्तिमत्त्वाची आयोजकांना परिचय करून देत त्यांनी दिलेल्या भेटी बद्दल सर्वच उपस्थीत मुस्लीम समाज बांधवांनी आनंद व समाधान व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.