loader image
[ays_poll id=7]

वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला

Dec 13, 2022


दरेगाव -( गोरक्षनाथ लाड )गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्यासह गहू, हरभरा व इतर पिकांची लागवड केली आहे. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर औषधांची फवारणी केल्याने कांदा पिकात सुधारणा झाली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिके पुन्हा पिवळी पडण्याबरोबरच त्यांच्यावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण होत आहे. आपली पिके या वातावरणातून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करताना दिसत आहेत. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून, शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज करताना अडचणी येत आहेत. उत्पादनापेक्षा फवारणीचा खर्च वाढल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शेतकयांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले होते. मात्र, तरीही चांगल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये रब्बी हंगामातील पिके घेण्याचा उत्साह होता. पण ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार का? अशी भीती शेतकयांना लागून राहिली आहे.


अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
.