loader image
[ays_poll id=7]

अज्ञाताने लावली मक्याला आग ; भार्डी येथील घटना – शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Dec 16, 2022


मनमाडहुन जवळच असलेल्या भार्डी या गावातील शेतकरी विनोद सरोदे यांच्या मळ्यात झाकून ठेवलेल्या २५ ट्रॉली मकापैकी ५ ते ६ ट्रॉली मक्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला आहे यात संपूर्ण मका जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाडनजीक असलेल्या भार्डी येथील तरुण शेतकरी विनोद सरोदे यांनी त्यांच्या मळ्यात जवळपास २५ ते ३० ट्रॉली मका बिट्या काढून ठेवल्या होत्या. यातील जवळपास पाच ते सहा ट्रॉली मका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली. सरोदे रात्री अकराच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता
सदर
प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घरातील लोकांना उठवून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आग लागलेल्या मक्याला बाजूला करत उर्वरित मक्का वाचाविला.सरोदे यांचे जवळपास दीड लाख रुपये नुकसान झाले. याबाबत सरोदे यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.

कृषी अधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.