loader image
[ays_poll id=7]

अनकाई येथील आराधना उद्यान केंद्रात रक्तदान शिबीरात 53 रक्तदात्यांचे रक्तदान

Dec 17, 2022


मनमाड :- प.पू.गुरुदेव हसमुख मुनीजी महाराज साहेब यांच्या ७९ व्या जयंती दिनानिमित्त आराधना उद्यान केंद्र अनकाई येथे झालेल्या रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
या ४0 व्या रक्तदान शिबीराचे उदघाटन प्रसिध्द साहित्यिक व पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील दिनेशभाई पारेख होते. सूत्रसंचालन कल्पेश देसाई ( पुणे ) यांनी केले.

संदीप देशपांडे यांचा परिचय शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांनी करुन दिला.

याप्रसंगी देशपांडे म्हणाले की, मन शांत ठेवायचं असेल , जीवनात आनंदी व्हायचं असेल तर माणूस जोडणं महत्वाचं आहे. या दुनियेत जीव घेणारे खूप आहेत पण जीव देणारे , जीवनदान देणारे माणसं येथे आहेत.
४० वर्षात सातत्याने , अखंडपणे ऐकाच दिवशी, एकाच ठिकाणी शिबीर भरवणे हा महाराष्ट्रात विक्रम असेल असे त्यांनी सांगितले. जीवनात माणूसपणं जपणं अत्यंत महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेशभाई म्हणाले की, प.पू.हसमुख मुनीजी म.सा.यांनी आपणास निष्काम कर्मयोग शिकविला. प्रवृत्ती , निवृती आणि विरक्ती यांचा संगम म्हणजे जीवन होय. दुसऱ्यासाठी जगणं आधिक सुंदर असतं.
नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीतर्फ रक्तसंकलन करण्यात आले.पोपटशेट बेदमुथा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.