loader image
[ays_poll id=7]

जैन धर्मीय सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ घोषीत केल्याच्या विरोधात नांदगाव येथे मुकमोर्चा

Dec 21, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे सर्व जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र तीर्थक्षेत्राशी जगातील प्रत्येक जैन धर्मीय व्यक्तीच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. कोणत्याही समाजाचे आदरस्थान सुरक्षित राहील ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास त्या ठिकाणी दारू, मांसाहार उपलब्ध होतील व अनैतिक घटना घडून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल.
केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून झारखंड सरकार तेथे पर्यटक यावेत म्हणुन निसर्गप्रेमी तसेच भक्तांच्या भावनांचा विचार न करता काम करणार असेल तर ते आमच्या आस्थेविरूद्ध असल्या मुळे आज नांदगाव शहरातून समस्त जैन समाजाने शांततामय मार्गाने निषेध फेरी काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले .
निवेदन देण्यासाठी खं .दि .जैन पचांयतचे अध्यक्ष सुशिल कासलीवाल विश्वस्त नुतन कासलीवाल राजेश बडजाते
उपाध्यक्ष कैलास कासलीवाल उप महामंत्री सुमेर कासलीवाल दत्तराज छाजेड’ विजय चोपडा ‘महावीर पारख’ सजंय लोहाडे ‘चंचल गंगवाल’ पियुष काला’ दिपक कासलीवाल ‘ आनंद कासलीवाल ‘ समीर कासलीवाल ‘ सचीन पारख ‘डॉ. आनंद पारख ‘ संजीव कासलीवाल ‘ आनंद चोरडीया ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ मनोज वाघ ‘ कान्हा कलंत्री ‘ जैन समाजासह इतरही समाजाचे नागरीक व कार्यकर्ते उपस्थीत होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.