मनमाड रेल्वे स्थानकांतून शिर्डीसाठी ७ ते ८ प्रवासी घेऊन टाटा मॅजिक ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी मनमाडकडून शिर्डीकडे भरधाव निघाली होती. मनमाडहुन गाडी निघाली असता मनमाड येवला रस्त्यावर अंकाई फाट्याजवळ रस्त्याने जात असताना गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. गाडीत काही तरी बिघाड झाला असावा किंवा गाडी जास्तच गरम झाली असावी त्यामुळे गाडी पेट घेऊ शकते हे लक्षात आले असतात चालकाने प्रसंगावधान दाखवत अंकाई फाट्याजवळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उभी करत गाडीत बसलेले सर्व प्रवासी तातडीने उतरवून देऊ त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. चालकाने गाडीखाली उतरून पाहणी करीत असताना इंजिनमध्ये आग लागली. पाहता पाहता गाडीने चांगलाच पेट घेतला होता. गाडी पेटल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गाडी चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली असली तरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता एवढी होती की, अवघ्या काही मिनिटांत गाडी पूर्ण जळाली. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येते. धावत्या गाडीने अचानक कसा पेट घेतला. याचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथून रेल्वेने मनमाडला आले व मनमाड येथून शिर्डी येथे खाजगी वाहनाने जात असतांना ही दुर्घटना घडली.
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...










