नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दिलासा म्हणून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेवून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई ची रक्कम नांदगाव तहसीलदार यांच्या खात्यात वर्ग केली.मात्र तीन वर्ष उलटूनही महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान झालेल्या जळगाव खुर्द येथील २६१ शेतकर्यांना मात्र नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले.यासंदर्भात वारंवार विनंती अर्ज व पुरावे सादर करूनही महसूल प्रशासन दाद देत नसल्याने जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी वंचित २६१ शेतकऱ्यांसह नांदगाव येथील तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण केले मात्र जिल्हाधिकारी कार्यालायाकडून मागणी केलेले अनुदान मिळणेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी,प्रशासनाची झालेली अडचण लक्षात घेता सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित करणेबाबत नांदगाव येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केलेल्या विनंतीवर वंचित शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली असता नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालक्यातील जळगाव खुर्द शिवारातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान होऊनही शासकीय मदत न मिळालेले वंचित शेतकरी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तसेच त्यानंतर जळगाव खुर्द येथील बसस्थानक येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वर रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करूनही महसूल प्रशासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देत नसल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघाचे नांदगाव तालुकाध्यक्ष तथा जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.














