loader image
[ays_poll id=7]

महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विरोधात महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल

Dec 30, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा म्हणून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेवून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई ची रक्कम नांदगाव तहसीलदार यांच्या खात्यात वर्ग केली.मात्र तीन वर्ष उलटूनही महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान झालेल्या जळगाव खुर्द येथील २६१ शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले.यासंदर्भात वारंवार विनंती अर्ज व पुरावे सादर करूनही महसूल प्रशासन दाद देत नसल्याने जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी वंचित २६१ शेतकऱ्यांसह नांदगाव येथील तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण केले मात्र जिल्हाधिकारी कार्यालायाकडून मागणी केलेले अनुदान मिळणेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी,प्रशासनाची झालेली अडचण लक्षात घेता सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित करणेबाबत नांदगाव येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केलेल्या विनंतीवर वंचित शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली असता नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालक्यातील जळगाव खुर्द शिवारातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान होऊनही शासकीय मदत न मिळालेले वंचित शेतकरी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तसेच त्यानंतर जळगाव खुर्द येथील बसस्थानक येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वर रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करूनही महसूल प्रशासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देत नसल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघाचे नांदगाव तालुकाध्यक्ष तथा जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.