loader image
[ays_poll id=7]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Jan 5, 2023


मनमाड 🙁 योगेश म्हस्के )थोर समाज सुधारिका , स्त्री शिक्षणाच्या जनक , कवियत्री , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

मनमाड येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे महिला मंडळाच्या वतीने व्याख्यान व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , याप्रसंगी सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून नवनिर्वाचित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष: श्रीमती नंदा अशोक गायकवाड, उपाध्यक्ष: सौ पद्मावती सोपान जाधव, कार्याध्यक्ष: सौ योगिता मनोज गांगुर्डे, सचिव: सौ लता चंद्रकांत मोकळ, सहसचिव: सौ अनिता संजय सोनवणे, खजिनदार: सौ संगीता महेश दारुंटे, सहखजिनदार: सौ भारती अशोक देवरे, प्रसिद्धी प्रमुख: सौ गीता संजय गवळी, संघटक: सौ वैशाली प्रकाश वानखेडे, या नूतन कार्यकारिणीचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

शिवम कॉम्पुटरच्या संचालिका सौ स्वाती भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आपले विचार प्रकट करून उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन केले. कुमारी प्रेरणा अशोक गायकवाड हिने आपले मनोगत व्यक्त केले ,लहानगी संस्कृती मनोज गांगुर्डे ही सावित्रीबाईंच्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सौ.अबोली गायकवाड व राजू रौंदाळे यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.पद्मावती जाधव व नंदिनी सोनवणे यांनी केली,तरआभार प्रदर्शन अध्यक्षा श्रीमती नंदा गायकवाड यांनी केले.यानंतर उपस्थित महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊन त्यांना भेट वस्तु देण्यात आल्या.

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.