loader image
[ays_poll id=7]

एप्रिल अखेर पर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश : जिल्ह्यातील १४ बजारसमितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Jan 6, 2023


ज्या बाजार समित्यांच्या निवडणूका हाेणे बाकी आहे त्या बाजार समित्यांच्या निवडणूका ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा बसताच आता बाजार समित्यांच्या निवडणुकिमुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

जिल्ह्यात 17 बाजार समित्या असून सटाणा, उमराणा, नामपुर या तिन बाजार समित्या वगळता उर्वरीत बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम 15 मार्चपासून सुरू हाेण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, मतदार याद्यांचा कार्यक्रम देखील नव्याने जाहीर हाेण्याची शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

ज्या बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे, तेथे तेच कायम ठेवण्यात येणार असून ज्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे किंवा संचालक मंडळ कार्यरत आहे तेथे प्रशासक नेमायचा किंवा कसे? याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याकडे म्हणजे, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आले आहेत. मतदार याद्यांबाबत अद्याप कुठल्याही स्वतंत्र मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या नसल्याचे कळते.जिल्ह्यातील चाैदा बाजार समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला हाेता, ताे जेथे थांबला हाेता तेथूनच सुरू केला जाताे का? पून्हा प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम नव्याने दिला जाताे हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे. मात्र, 30 एप्रिलच्या आत निवडणूक घ्यायच्या असतील किमान 45 दिवस अगाेदर म्हणजे, 15 मार्चला निवडणूक कार्यक्रम लागू शकताे अशी दाट शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

नाशिकसह पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, इगतपुरी, देवळा, चांदवड अशा माेठ्या बाजार समित्यांचा समावेश या चाैदा बाजार समित्यांमध्ये आहे. त्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला हाेता. आता या निर्णयामुळे मात्र निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. गावपातळीपर्यंत या निवडणूकीच्या हालचाली पहायला मिळणार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.