loader image
[ays_poll id=7]

नांदगावचे गवळी आणि कांबळेंची मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी निवड

Jan 7, 2023


वर्धा येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी नांदगाव येथील गझलकार काशिनाथ गवळी आणि रविंद्र कांबळे यांची निवड झाली आहे. संमेलन दि. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून तीनही दिवस गझल कट्ट्यावर मुशायरे होणार आहेत. यात पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटन समारोहानंतर दुपारी २ वाजता गझल कट्ट्याचे उद्घाटन होईल आणि मुशायऱ्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी साधारणतः पाच-सहा मुशायरे होणार असून यात प्रामुख्याने विदर्भातील गझलकारांचा सहभाग राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ४ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान आठ ते दहा मुशायरे होतील. तर समारोपाच्या दिवशी दि. ५ फेब्रुवारीला पुन्हा पाच-सहा मुशायरे होतील. या दोन्ही गझलकारांचे व कवितेसाठी कवयत्री प्रतिभा खैरनार यांची कविता वाचनासाठी निवड झाली आहे .
त्यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगांव तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.