loader image
[ays_poll id=7]

अशोक सराफ दक्षिण भारतात असते तर आज मुख्यमंत्री असते – राज ठाकरे

Jan 9, 2023


मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ह्या कार्यक्रमालाउपस्थित होते. राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे कौतूक केले करतांना ते म्हणाले की अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते.
“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळे असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणे सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.


अजून बातम्या वाचा..

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम...

read more
केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

read more
.