loader image
[ays_poll id=7]

शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची हेळसांड थांबविण्याची फुले शाहू आंबेडकर विचार मंच ची मनमाड आगार प्रमुखांकडे मागणी

Jan 24, 2023


शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना बस सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी व इतर समस्यांबाबत मनमाड ते नांदगाव दरम्यान नागापूर,पानेवाडी,धोटाने, हिसवळ,शास्त्रीनगर आदी भागासह इतर खेड्यापाड्यातील विद्यार्थी नांदगाव व मनमाड या ठिकाणी शाळेत जातात. या सर्व विद्यार्थ्यांना एस.टी. महामंडळाचे पासेस उपलब्ध आहेत. मात्र आपल्या आगारातील वाहक चालक हे या विद्यार्थ्यांना बसमधून नेण्यासाठी टाळाटाळ करतात यासह आपल्या बस डेपोतून सुटणाऱ्या अनेक बसेस देखील वेळेवर नाही यामुळे विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासह बस स्थानकात देखील अनेक असुविधा आहेत पिण्याचे पाणी नाही अस्वच्छता आदी अनेक समस्या आहेत. रस्त्यांना खड्डे पडलेले आहे. नवीन शेडजवळ साफसफाई होत नाही, तेथे दुर्गंधी झालेली आहे. तसेच बसेस ची होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे बस थांबा दिलेला असुन, तेथे बोर्ड लावण्यात यावा. यामुळे आपण प्राधान्याने लक्ष देऊन वरील समस्यांचे निवारण करावे अन्यथा आम्ही फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करू व होणाऱ्या परिणामस सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असा इशारा फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने येथील मनमाड आगार प्रमुख यांना देण्यात आले.

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.