loader image
[ays_poll id=7]

स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजना – विकास दादा काकडेंचे मनमाडकरांना आवाहन

Jan 25, 2023


स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजनेअंतर्गत गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण काम करीत आहोत या योजनेअंतर्गत घराघरातून निघणारे वापरलेले प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिक पिशव्या वेस्टने प्लास्टिक कागदाचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या बारीक बारीक वस्तू या कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करून पुनर्वापरासाठी म्हणजेच त्यापासून नवीन प्लास्टिकच्या वस्तू बनविण्यासाठी वापर केला जाईल असा प्रयत्न असतो. या योजनेमुळे प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक कागदाचे तुकडे हे इतरत्र न पसरता व त्याचा कचरा न होता आपले शहर पण स्वच्छ राहील असा प्रयत्न आहे .या योजनेअंतर्गत अशा प्लास्टिकच्या पिशव्या एका तारेच्या हुक मध्ये अडकवून ठेवल्यास त्यात जमा करायला सोप्या होतात अशा प्रकारच्या तार फाईल मध्ये प्लास्टिक पिशव्या जमा करून मनमाड येथील सौ. रेखा राजेश पाटील या नियमितपणे प्लास्टिक पुनर्वापरासाठी जमा करीत असतात. आपणही अशा प्रकारे प्लास्टिक वेगळे जमा करून पर्यावरण मित्र म्हणून काम करू शकतात. आपणा सर्वांना नम्र विनंती. वाया जाणाऱ्या प्लास्टिकच्या स्वच्छ पिशव्या किंवा प्लास्टिकचे तुकडे कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करा व आम्हाला कॉल करा आम्ही त्या घेऊन जाऊ किंवा पल्लवी मंगल कार्यालयात आपण जमा करू शकता. संपर्क, ९४२२२४८८३० विकास काकडे, दत्त मंदिर रोड ,पल्लवी मंगल कार्यालय, मनमाड.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.