loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक – मनमाड शहर पोलिसांची कामगिरी

Jan 30, 2023


मनमाड शहरात रविवारच्या आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन भामट्यांना मनमाड शहर पोलिसांनी शिताफीने पकडत त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत केले.

याबाबत माहिती की, दिनांक २९-०१-२०२३ रोजी मनमाड शहरातील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारातुन आठवडे बाजारात बाजार खरेदी साठी आलेल्या दोन नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले होते. त्याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद गिते यांनी लागलीच आठवडे बाजारात पेट्रोलिंग साठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या असता आठवडे बाजारात साई प्रसन्न लॉन्स समोर संशयास्पद हालचाल करतांना मिळुन आलेले ०१) सुनिल कोयल पवार वय २२ वर्ष ०२) लकी परबेसिंग सोलंकी वय २० वर्ष दोन्ही राहणार २८, मेनरोड, उनिदा भोपाल मध्यप्रदेश यांची चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात गुन्हयात चोरीस गेलेले दोन मोबाईल व एक मोटारसायकल मिळुन आली. आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण, मा. श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव, मा. श्री समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिले. पोना गणेश नरोटे, पोना मुदस्सर शेख पोशि गौरव गांगुर्डे, पोशि राजेन्द्र खैरनार, पोशि रणजित चव्हाण, पोशि संदिप झाल्टे, पोशि राहुल बस्ते, मपोशि सपना गवांदे यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.