loader image
[ays_poll id=7]

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

Feb 2, 2023


­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी व बारावी लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहेत. परंतु, त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेश केंद्रांना देण्यात आलेले आहेत. यापूर्वी एखाद्या परिस्थितीत दहा मिनिटे उशीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. परंतु, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणारी दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता होणार आहे.परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रकदेखील मंडळाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

उशीरा येण्याच्या सवलतीचा फायदा घेऊन लेखी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.


अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.