loader image
[ays_poll id=7]

महावितरणने पुरवली विक्रमी २४,७५० मेगावॅट वीज

Feb 2, 2023


नाशिक/मुंबई, दि.२ फेब्रुवारी २०२३ :
महावितरणने ३१ जानेवारी २०२३ रोजी राज्यभरातील ग्राहकांना २४,७५० मेगावॅट इतका आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी वीज पुरवठा केला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

कोरोनाची साथ येण्यापूर्वीच्या २०१९ – २० या आर्थिक वर्षात फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वाधिक २१,५७० मेगावॅट वीज पुरवठा महावितरणने केला होता. मार्चच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा वीज वापर खूप कमी झाला पण घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्यावेळी एप्रिल २०२० या महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक वीज पुरवठा १६,६९० मेगावॅट इतका झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होऊन लॉकडाऊन मागे घेण्यात आला तसा वीजवापर वाढला. २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मार्च महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा २२,५५४ मेगावॅटवर पोहोचला.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आर्थिक व्यवहार वाढत गेले आणि राज्यातील वीजवापरही वाढला. २०२१ -२२ या आर्थिक वर्षातील सर्वाधिक वीज पुरवठा मार्च २०२२ या महिन्यात २४,२१९ मेगावॅट इतका झाला.

चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात वीजवापर मोठ्या प्रमाणात होत असून एप्रिल २०२२ महिन्यात सर्वाधिक वीजपुरवठा २४,६६८ मेगावॅट इतका होता. जुलै या पावसाळी महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा १९,१५७ मेगावॅट इतका होता. ऑगस्टमध्ये हा आकडा वाढला. पुढे त्यात थोडी कपात होऊन सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वाधिक वीज पुरवठा अनुक्रमे १९,०७६ मेगावॅट व १९,०२२ मेगावॅट इतका झाला. त्यानंतर राज्यातील वीजवापर आणखी वाढत गेला. डिसेंबर हा थंडीचा महिना असूनही त्या महिन्यातील सर्वाधिक पुरवठा २४,०६७ मेगावॅट एवढा होता. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तर २४,७५० मेगावॅट इतक्या सर्वाधिक वीज पुरवठ्याचा विक्रम झाला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.