loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच मध्य रेल्वे झोनल कमिटीने घेतली ना.रामदास आठवले यांची भेट

Feb 4, 2023


ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशन मध्य रेल्वे झोनल कमीटी तर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दि 2/2/2023 रोजी त्यांच्या नवी दिल्ली स्थित 11 सफदरजंग येथे निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. याप्रसंगी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्रीय इंजिनीरिंग कारख़ाना व ओपन लाइन मनमाड़ येथे कार्यरत अनेक कर्मचारी नाशिकरोड येथून ये जा करीत असतात. सकाळी देवलाली येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 11113 ही सकाळी 7.30 वाजता सूटते ज्यामुळे अनेक कामगारांची ग़ैरसोय होते. ही गाड़ी सकाळी 6 वाजता देवलाली येथून सुटावी या मागणी साठी ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशनच्या वतीने मा.केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देऊन रेल्वे मंत्रालय येथे पाठपुरावा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.याप्रसंगी झोनल सचिव सतीश केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, राजेश थोरात,झोनल कमीटी सदस्य हेमंत गांधले,इरफान शेख,अजय वाघमारे,अतुल तायड़े,योगेश पवार,श्रीकांत भालेराव,वैभव वाघमारे,अशोक सुरवाड़े,भाऊसाहेब गाड़े,संदीप रणदिवे,कल्याण धिवर,प्रेमदिप खड़ताले, विनोद खरे, रोहित भोसले,राकेश ताठे इत्यादी उपस्थित होते.
या मागणीवर आठवले यांनी तत्काळ रेल्वे मंत्री मा.रावसाहेब दानवे यांचेकडे पत्र देऊन पाठपुरावा केला आहे.त्याबद्दल मा.आठवले यांचे सदर कामगरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे मंत्रालय तत्काळ कार्यवाही करून कामगरांना दिलासा देईल अशी अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.