loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आदित्य ठाकरे

Feb 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजरात ला जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.
असल्याचा आरोप शिवसेनानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसंवाद यात्रा निमित्ताने नांदगाव येथील जैन धर्म शाळेत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते..

यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अद्वय हिरे .जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..
शिवसेना नेते व माजी मंत्री  आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजराल जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.तसेच आज मी राज्यात जिथे फिरत आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे. मात्र गद्दार जिथे जातात तिथे जनता त्यांना उभे करत नाही. आजच्या सभेला महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येत आहे . शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. संपूर्ण राज्य महाविकास आघाडीसोबत उभे आहे. ज्यांनी गद्दारी केली ते जनतेला पटलेले नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेची जी सेवा केली, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नाव अग्रस्थानी राहिले. खोकेवाल्यांच्या सभा बघा व आमच्या सभा बघा. आमच्या सभेला जनता स्वतःहून येते व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात.. पारंपरिक मतदार शिवसेनेसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 
यावेळी अल्ताफ खान, अव्दय हिरे
गणेश धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.