loader image
[ays_poll id=7]

भारताचे संविधान हा विषय शाळा-महाविद्यालयात अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत – शरद शेजवळ

Feb 10, 2023


येवला (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे यांना पाठवलेल्या राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये यांत ‘भारतीचे संविधान’ हा अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे अध्यापकभारती कडून स्वागत करण्यात आले असल्याची माहिती अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील माननीय कुलगुरू सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या मा.कक्ष अधिकारी अ.द.काटकर साहेब यांच्या सही निशी निर्गमित केलेले राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये यांत ‘भारतीचे संविधान’ हा अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्या संदर्भातील दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ चे जावक क्रमांक Gen/९७/ UE -३ हे पत्र निर्गमित झाले असून ह्या निर्णयाचे शरद शेजवळ यांनी स्वागत,अभिनंदन केले आहे.
भारतीय संविधानिक मूल्य विचार लोकशाही,समता,स्वातंत्र्य, बंधुता,न्याय,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टिकोन,राष्ट्रीय एकता-एकात्मता ह्या मूल्यांची रुजवणूक-संस्कार बालवयापासून मुलांमध्ये रुजावेत व वयोगटाप्रमाणे शाळा-महाविद्यालय व विद्यापीठातून “भारतीय संविधान” हा स्वतंत्र (अनिवार्य) विषय शिकवला जावा या करता आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकार या कडे आग्रही भूमिका मांडत असून ह्या मागणी करता परिसंवाद,परिषदा, मेळावे,अधिवेशने,व्याख्याने घेऊन लोकजागृती करत आहोत.आपल्या विभागात ह्या करता अनेक निवेदने दिली आहेत व सरकारच्या संबंधित सर्व विभागाकडे आग्रही मागणी केली आहे.
अध्यापकभारती,अखिल भारतीय संविधान साक्षरता अभियान स्वागत करत असून ह्या कामी आम्ही सरकारच्या सोबत आहोत.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांनाही उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या सदर पत्राप्रमाणे ‘भारताचे संविधान’ विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अध्यापणास सुरवात करण्याचे आदेश द्यावे.शाळा महाविद्यालयात परिपाठ मूल्य शिक्षण तासाला रोज एका भारतीय संविधान कलमाचे वाचन करण्यात यावे अशी मागणी अध्यापकभारतीने शासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक-शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती व अखिल भारतीय संविधान साक्षरता अभियान वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर शरद शेजवळ,शैलेंद्र वाघ,सुभाष वाघेरे,महेंद्र गायकवाड,वनिता सरोदे,नितीन केवटे,प्रा.के.एस.केवटे,अक्षय गांगुर्डे,अभय लोखंडे,प्रशिल शेजवळ,राजरत्न वाहुळ यांच्या सह्या आहेत.

 


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.