हत्या झालेले राजापूर
येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरीचीही हमी मंत्री सामंत यांनी घेतली आहे. वारिशे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये आणि इतर माध्यमातून पंधरा लाख रुपये मदत वारिशे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या शिवाय वारिशे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्वीकारली.
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...








