loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

Feb 15, 2023


संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला.
वसंत नगर तांडा तसेच ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना अंजुम ताईंनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावी च्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये येणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार सुहास अण्णा कांदे व आम्हा सर्व कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही राहणार, तसेचआपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी केले.
बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही जवान या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचे ताईंच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले, ताईंनी तिचा सत्कार करत तिला 501 रुपयांचे बक्षीस या वेळी दिले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, भोपालाल राठोड गोरख चव्हाण, ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच सदस्य आदींसह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मात्र भगिनी उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.