loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न

Feb 15, 2023


मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न आज मनमाड शहरातील संस्कार खेळवाडी या संस्कार शाळेच्या अडीच ते पाच वर्ष वयोगटाच्या चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयला क्षेत्र भेट दिली. आजच्या आधुनिक विश्वा मध्ये सोशल मीडिया ला अनन्य साधारण महत्व आले आहे.व्हाट्स ऍप्प, फेसबुक, त्याच बरोबर टेलिव्हिजन ने देखील नवीन पिढी ला प्रचंड आकर्षित केले आहे म्हणूनच अगदी बाल वयातच बालकांना पुस्तकं म्हणजे काय ? याची ओळख व्हावी याच उद्देशाने या अभिनव कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ /पुस्तके अगदी कुतूहलाने पहिली. काही चित्रमय पुस्तके त्यांना हाताळण्यास देण्यात आली चित्रमय पुस्तकातील रामायण महाभारत यातील अनेक पात्र ची ओळख व नावे विद्यार्थ्यांनी त्वरित सांगितली तर वाचनालय च्या भिंती वर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , झाशीची राणी याच्या सह अनेक राष्ट्रपुरुष ची ओळख ही विद्यार्थी नी सांगितली यावेळी मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितिन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संस्कार खेळवाडी चे उमेश कुलकर्णी, सौ कविता अहिरे, सौ रुपाली गागरे, रुपाली बागुल मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी उपस्थित होते. वाचनालय चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद करीत त्यांचे प्रश्न ची उत्तरे दिली या अभिनव उपक्रमात 50 पेक्षा जास्त बाल विद्यार्थी नी सहभाग घेतला. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.