loader image
[ays_poll id=7]

चला गड किल्ला बनवुया , मातीशी नाते जोडूया….नांदगाव-मनमाड पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन…..

Feb 17, 2023


मनमाड :  ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृतीचे मातीचे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली असून मनमाड शहरातील नागरिकांनी या विनामूल्य स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने मनमाड शहरात शिवजयंतीनिमित्त गड किल्ले उभारणी स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आले आहे. ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन शिवजयंती निमित्त शिवरायांचे गड किल्ले मातीत बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत स्वराज्यासाठी महाराष्ट्रभर विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गड किल्ले उभारले, गड किल्ले जिंकले त्यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी १७ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली प्रवेशिका त्यात आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिवरायांचा कोणता किल्ला बनवणार त्याचे नाव यासह इतर माहिती असलेली प्रवेशिका पत्रकार उपाली परदेशी (9226727877), योगेश म्हस्के (8149888554), मिलिंद वाघ सर (9270885350) या क्रमांकावर पाठवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी काही नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्वतःच्याच घरी पर्यावरण पूरक शिवरायांचे मातीचे गड किल्ले बनवण्याचे आहेत.
पर्यावरण पूरक गडकिल्ले मातीत बांधणे, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करावी, प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका १७ तारखेपर्यंत पाठवणे, नाव नोंदणी अनिवार्य आहे. परीक्षण २० फेब्रुवारी रोजी घरी जाऊन करण्यात येईल, बक्षीस वितरण शिवजयंती झाल्यानंतर करण्यात येईल, स्पर्धा शहर पातळीवर खुली राहील, परिक्षणाचे मुद्दे गट कार्य नियोजन, नावीन्य व कल्पकता, किल्ले विषयाची माहिती किल्ल्याची सुबकता असे असणार आहे. यशस्वी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जातील अशी माहिती नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.