loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय असंवैधानिक – माधव शेलार

Feb 18, 2023


मनमाड – निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मनमाड शहर शिवसेना ( ठाकरे गट) शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रक प्रसिद्ध करत निवडणूक आयोगाचा निर्णय हा असवैधानिक असल्याचे म्हटले आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले हे कृत्य कोणत्याही आधारे कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने वेळोवेळी मागितलेली माहिती व पुरावे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सादर केली आहे. तरी देखील त्याचा काही एक विचार न करता सत्ताधारी पक्षाच्या दबावापोटी एकतर्फी निर्णय देण्यात आला. यावरून हे सिद्ध होते की या देशात संविधानाला न मानणारा एक घटक तयार झाला आहे व देश हळूहळू गुलामगिरी कडे झुकत चालला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बहाल करण्याचे वेळेस असे उदगार काढले होते की, अथक प्रयत्न करन जे संविधान लिहीलेले आहे ते लोकहितासाठी आहे, परंतु सरकार बेजबाबदार असेल तर या संविधानाला कुठलाही अर्थ राहणार नाही व देश पुन्हा गुलामगीरीत जाईल. सद्यस्थितीत तेच घडताना दिसत आहे. संविधानाचा योग्य प्रकारे पालन होतांना दिसत नाही. आय.टी,सि.बी.आय, ईडी आणि केंद्रीय निवडणूक आयोग या सर्व यंत्रणा केंद्र सरकारच्या इशा-यावर चालत आहे. असेच चालत राहिले तर पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल, मी नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की यामुळे घाबरून जाण्याची खचून जाण्याची गरज नाही. कारण आपण सर्व हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत व कोणत्याही बिकट परिस्थितीत पक्षप्रमुख उदय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे शिवसैनिक आहोत, जो घाबरला तो शिवसैनिकच नाही. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही हे ब्रीदवाक्य ही घोषणा शिवसेनेचीच आहे. ठाकरेशाही इतक्यात संपणारी नाही तर हा एक उगवता सूर्य आहे.जसे आकाशातील सूर्यशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, तसेच महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे व त्यांचे वंशज उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही. आजच्या परिवर्तीत एकच सांगू इच्छितो की सत्य परेशान हो सकता है। लेकीन, कभी पराजित नहीं हो सकता है।

सत्येचा न्याय हक्काचा लढा संविधानिक मार्गाने उभारण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र एकवटल्याशीवाय राहणार नाही. विजय हा सत्यात होईल. समुद्राला घाबरणारी नाव (होडी) कधीही किनारा गाठत नाही. आणि प्रयत्न करणा- याला अपयश येत नाही.

खंबीर, कणखर, स्वाभीमानी नेतृत्व म्हणजेच उध्दव बाळासाहेब ठाकरे सत्य मेव जयते॥ जय महाराष्ट्र ॥


अजून बातम्या वाचा..

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
.