loader image
[ays_poll id=7]

लक्ष्मीनगर(नांदगाव)श्री.लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नांदगाव सोमनाथ घोंगाणे

Feb 21, 2023


नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे श्री लक्ष्मीमाता देवीचे मंदीर बांधण्याची कॉलनीतील नागरिकांची ईच्छा होती परंतु हा विषय सौ.अंजुम ताईंच्या पुढाकारातून मार्गी लागला असून लवकरच या जागेवर लक्ष्मी मातेचे मंदिर बांधून पूर्ण होणार आहे.
लक्ष्मीनगर करांनी सौ.अंजुम ताईं कांदे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले, तसेच मंदिरासाठी पुढाकार घेतल्याने आभार ही मानले. ताईंच्या शुभहस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आपली संस्कृती जपनं ही काळाची गरज आहे, मंदिर असणं त्याची देखभाल करण हे ही महत्वाचं असल्याचं या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी मत व्यक्त केले. मंदिर झाल्यानंतर त्वरित आमदार निधीतून सभामंडप दिला जाईल असा विश्वास ही दिला.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष विद्याताई जगताप, मनमाड शहर अध्यक्ष संगीताताई बागुल, नांदगाव शहराध्यक्ष रोहिणी मोरे, समन्वयक भारती बागोरे, शहर उपाध्यक्ष तब्बसूम शेख, सौ.नावंदर,सौ. दुसाने,सौ. डोमाडे, सौ.जावरे, सौ.चांडक, सौ.भारती बोरसे, सौ.गरुड, तसेच राजेंद्र मोरे सर, सतीश शिंदे, दिलीप शेठी, सोमनाथ दुसाने, सचिन काकळीज, नितीन चांडक, अमोल नावंदर, नंदन करवा, ज्ञानेश्वर वाघ, जुगल किशोर अग्रवाल, प्रमोद चव्हाण, दामोदर डोमाडे आदी उपस्थित होते सौ.प्रियांका पाटील मॅडम यांनी सूत्र संचालन केले .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.