loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात तृणधान्यविषयी प्रगतिशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

Feb 22, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे युनोस्को ने घोषित केलेल्या “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023” निमित्त दरेगावचे पोलीस पाटील प्रगतिशील शेतकरी मा. सोमनाथ गांगुर्डे यांचे तृणधान्या विषयीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील हे होते. मा. सोमनाथ गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतातून बाजरी, ज्वारी, नाचणी यासारख्या कडधान्यांचे आहारातील महत्त्व विशद करून, त्या पिकांवर होणारे वातावरणीय बदलांचे परिणाम याविषयी अनुभव पर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे( गांडूळ खत) वळले पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्त्व बघता त्यावर संशोधनात्मक दृष्टीने काम करून त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे डी वसईत, सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी तर आभार प्रदर्शन डॉ.गणेश गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे, नॅक कॉर्डिनेटर डॉ. मिलिंद आहिरे, एनसीसी प्रमुख कॅप्टन प्रकाश बर्डे, एनएसएस स्वयंसेवक स्वयंसेवीका, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.