loader image
[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा संपन्न

Feb 28, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी . कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खुशबू खेमणार व भावना आबड (विद्यार्थी पालक) म्हणून उपस्थित होत्या. यांच्या हातून विज्ञान प्रदर्शन हाॅलची रिबीन कट करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सौ. मोहिनी देसले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या संशोधकांविषयी माहिती दिली.या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन ,चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके ,प्रश्नमंजुषा यांसारखे बरेच उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. विद्यार्थ्यांचे प्रयोग प्रात्यक्षिके बघण्यासाठी पालकही उपस्थित होते.
विद्यालयातील प्राचार्य श्री. मणी चावला सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी मिळून यशस्वी रित्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा पार पाडला.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.