loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2023


मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. भारताचे प्रथम नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ सी व्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी १९३० ला रॅमन इफेक्ट हा शोधनिबंध सादर केला व त्या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी १९८७ पासुन विज्ञान,माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सुरगाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिगावकर यांचे ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी विकास ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या आसपास घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहून त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेऊन सामाजिक उन्नती करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करावा जसे की शेतीमध्ये जैविक शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान असे दाखले त्यांनी दिले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी नॅनो टेक्नॉलॉजी चे महत्व विशद करून ही टेक्नॉलॉजी मानव जीवनाला उपयुक्त असेल हे उदाहरणसह पटवून दिले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे डी वसईत, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एम. डी अहिरे, सूत्रसंचालन डॉ राहुल शिंदे तर आभार प्रदर्शन गणित विभाग प्रमुख डॉ. एस एम चिंचोले यांनी केले. या कार्यक्रमास विज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी. जी कापडणीस, डॉ. बी.एस.देसले,प्रा. डब्ल्यू.के. गागरे तसेच विज्ञान विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.