मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका डब्यातील खालील भागातून अचानक धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही रेल्वे गाडी उगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यानंतर चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर ब्रेक दुरुस्त करत गाडी मनमाड च्या दिशेने रवाना झाली. यावेळी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत पोहचण्यासाठी हाल झाले.
आनंदी सांगळे ने पटकावले रौप्य पदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या ६९ व्या स्कूल गेम्स मध्ये मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळा...











