मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका डब्यातील खालील भागातून अचानक धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही रेल्वे गाडी उगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यानंतर चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर ब्रेक दुरुस्त करत गाडी मनमाड च्या दिशेने रवाना झाली. यावेळी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत पोहचण्यासाठी हाल झाले.
मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...






