loader image
[ays_poll id=7]

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

Mar 5, 2023


आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नसल्याचा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचे खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांना दोन महिन्यात ‘क्लास वन’ नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या विषयावर विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. राज्य शासनाकडून या खेळाडूंची उपेक्षा होत असून त्यांना नोकरीचे आश्वासन दिले असल्याने शासनाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली होती.
आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना मिळाला आहे.

३० एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी शासकीय सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत.
या खेळाडूंनी हे निकष पूर्ण केलेले असताना त्यांना अद्याप शासकीय नोकरी का मिळाली नाही, असा मुद्दा माजी मंत्री भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना क्रीडामंत्री महाजन म्हणाले, नवीन क्रीडा धोरणानुसार या खेळाडूंना ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.