loader image
[ays_poll id=7]

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

Mar 5, 2023


सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील संबंधित त्रुटी असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे एकूण सहा गुण देण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कवितेवर आधारित प्रश्नात ए-३ आणि ए-५ क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून छापण्यात आले नव्हते, तर ए-४ क्रमांकाचा प्रश्न विचारण्याऐवजी तेथे उत्तर छापण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या छपाईतील चुकीबाबत राज्य मंडळाने यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, पेपरमधील त्रुटींबाबत नियामक मंडळाच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राज्य मंडळाने जाहीर केले. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारामुळे नियामक मंडळाची बैठक गेल्या ११ दिवसांत होऊ शकली नाही.

शिक्षणमंत्र्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर इंग्रजी विषयाच्या पेपरबाबत प्रमुख नियामकांची सभा घेण्यात आली.

इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी, चुका असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास आले. त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देण्याचे, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
.