loader image
[ays_poll id=7]

अवकाळी पावसाची कृपा अन् महावितरण कंपनीची मेहेरबानी – मनमाडकरांचा होळी सण अंधारात

Mar 6, 2023


मनमाड – काल दुपार पासून ढगाळ वातावरणानंतर रात्री नऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटाने मनमाड शहर व परिसर अक्षरक्षः दणाणून गेले. साडेनऊच्या सुमारास अचानक शहराचा वीजपुरवठा पूर्ण खंडित झाला आणि अवकाळी पावसाला सुरवात झाली. शहर अंधारात बुडाले. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी शहर आणि परिसरात कोसळत होत्या. बदलत्या वातावरणामुळे शेतकरीही धास्तावले आहेत. एकीकडे शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकरी पुन्हा एकदा आसमानी आणि सुलतानी संकटात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष आणि कांद्याच्या पिकाचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. नव्याने लागवड झालेल्या टोमॅटो पिकालाही ह्या हवामानाचा फटका बसणार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.