loader image
[ays_poll id=7]

के आर टी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

Mar 11, 2023


कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळेस मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी. विश्वास धनंजय निंभोरकर. उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता सहावीच्या तृषांत गायकवाड. समीक्षा पगारे .यांनी आपले मनोगत व्यक्त केले.” स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती. अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला. वाचायला. शिकवले व स्त्री शिक्षणाचा पायारचला .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी १जानेवारी १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिला शाळा काढली .सावित्रीबाईंनी बालविवाह. केशवपन .सतीप्रथा .अशा वाईट प्रथांना विरोध केला .त्यांनी काव्यफुले बावनकशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली अखेर १० मार्च १८९७ रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला .अशा या तेजस्वी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम या विद्यार्थ्यांना अमिता झाडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समर्थ इप्पर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.