loader image

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Mar 14, 2023


नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवारी ता.१३ रात्री शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले शेतकरी नाना गमन चव्हाण वय (६०) यांच्या अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्याच्या दोन म्हशी विज पडून दगवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोमवारी ता.१३ ला रात्री अचानक वातावरण बदल होत पावसाला सुरुवात झाली तांदूळवाडी येथे शेतात काढलेला कांदा झाकण्यासाठी नाना गमन चव्हाण हे तांदूळवाडीचे उपसरपंच सुदाम काळे यांच्या दुचाकीवर शेतात गेले.शेतात गेल्यावर काही वेळातच विजेचा कडकडाट सुरू झाला नाना चव्हाण कांदे झाकत असताना अचानक यांच्या अंगावर वीज कोसळली व क्षणात त्यांचा मृत्यू झाला ही घटना उपसरपंच प्रत्यक्षात पहिली त्यांनी त्वरित ही घटना चव्हाण कुटुंबियाना कळविले या दुर्देवी घटनेबद्दल तांदूवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलीस पाटील,सरपंच यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.