नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवारी ता.१३ रात्री शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले शेतकरी नाना गमन चव्हाण वय (६०) यांच्या अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्याच्या दोन म्हशी विज पडून दगवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोमवारी ता.१३ ला रात्री अचानक वातावरण बदल होत पावसाला सुरुवात झाली तांदूळवाडी येथे शेतात काढलेला कांदा झाकण्यासाठी नाना गमन चव्हाण हे तांदूळवाडीचे उपसरपंच सुदाम काळे यांच्या दुचाकीवर शेतात गेले.शेतात गेल्यावर काही वेळातच विजेचा कडकडाट सुरू झाला नाना चव्हाण कांदे झाकत असताना अचानक यांच्या अंगावर वीज कोसळली व क्षणात त्यांचा मृत्यू झाला ही घटना उपसरपंच प्रत्यक्षात पहिली त्यांनी त्वरित ही घटना चव्हाण कुटुंबियाना कळविले या दुर्देवी घटनेबद्दल तांदूवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलीस पाटील,सरपंच यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...











