loader image
[ays_poll id=7]

आधार कार्ड धारकांना खूषखबर – तीन महिने करा आधार अपडेट ते ही मोफत

Mar 17, 2023


तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करणे आवश्यक आहे. प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असून तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर यंदा तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. सरकारने देशातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधारसाठी ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता आधार अपडेट करण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. मात्र, ही सुविधा ऑनलाइन अपडेट करण्यासाठीच मिळेल आणि ते देखील फक्त तीन महिन्यांसाठी.

आधारकार्ड धारक जर त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी फिजिकल काउंटरवर गेल्यास त्यांना पैसे भरावे लागतील. UIDAI ने सांगितले की आधार धारक तीन महिन्यांसाठी मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ मिळेल. आधार कार्ड धारक १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करू शकतात.

सध्या आधार कार्डात कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच आधार केंद्रावर जाऊनही दस्तऐवज अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागायचे. यापूर्वी, आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी रहिवाशांना २५ रुपये शुल्क द्यावे लागत होते. तर ऑनलाइन आधार अपडेट करण्यासाठीही शुल्क आकारले जात होते. पण आता ही प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे. अशा स्थितीत सरकारच्या या सवलतीचा फायदा आधार कार्डधारक घेऊ शकतात. सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. जर अनेक वर्षांपासून तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले नाही तर तुम्हाला सरकारच्या या निर्णयाचा चांगलाच फायदा होईल. कारण आता आधार अपडेट करणे खूप सोपे झाले असून तुम्ही घरबसल्या देखील UIDAI वेबसाइटवर जाऊन काही मिनिटांत तुमचे आधार अपडेट करू शकता. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत असला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकता.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.